चला तर मित्रांनो हनुमानजिच्या लग्नाबद्दल च्या महितीबरोबरच ते पवन पुत्र का ओळखले जातात. हे पण जाणून घेऊ.
आपल्याला माहीत आहेच अंजणी या त्यांच्या माता आहेत आणि केसरी हे त्यांचे पिता आहेत. पण मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का श्री हनुमानांचे 5 सख्खे भाऊ होते. म्हणजेच अंजणी व केसरी यांना एकूण 6 मुले होती . त्यातीलच हनुमान हे सर्वात मोठे भावंड होते. हनुमानांच्या या 5 भावंडांची नावे 1. मतीमन 2. श्रुतीमन 3. केतुमन 4. धृतीमन 5. गतिमन अशी आहेत. श्री हनुमानांची पाचही भावंडे विवाहित होती. त्यांना पुत्र देखील होते. मित्रांनो पाच पांडवांपैकी एक असलेले भीम हे सुद्धा श्री हनुमानांचे बंधु होते. कारण भिमंच जन्मही वाऱ्याच्या आशीर्वादानेच जल होता. आणि हनुमानांचा जन्मही पवणपुत्र म्हणजेच वाऱ्याच्या आशीर्वादानेच जल होता. या अर्थाने भीम व हनुमान ही भावंडेच झाली.
मित्रांनो हनुमानांकडे प्रचंड शक्ति होती. तसेच आपण हनुमनांना बालभ्रमहाचारी म्हणून ओळखतो. हनुमान ब्रम्हचारी जरी असले तरी त्यांचा विवाह देखील झाला होता. श्री हनुमानांच्या विवाहाच्या एकूण 3 कथा आहे. म्हणजेच त्यांचे 3 विवाह झाले आणि त्यांना 3 पत्नीही होत्या.
हनुमान ची बायको कोण?
त्यांच्या पहिल्या पत्नी सुवर्चला या सूर्यादेवाच्या पुत्रि होत्या. आपल्याला तर माहीतच असेल सूर्यादेवता श्री हनुमानांचे गुरु होते. तर हनुमान जेव्हा शिक्षण घेत होते. तेव्हा सूर्यादेवाने त्यांना 9 विदयांपैकी 5 विद्या शिकवल्या होत्या मात्र उरलेल्या चारही विद्या फक्त विवाहितच व्यक्ति शिकू शकत होत्या पण हनुमानांना सर्वच विद्या क्षिकेच्या होत्या. अशा परिस्थितीत सूर्यदेवांनी त्यांची मुलगी सुवर्चला हिच्याशी श्री हनुमानांचा विवाह केला. त्यामुळे ते उरलेल्या चारही विद्या शिकू लागले. मात्र त्यांचा विवाह झाला असाल तरी त्यांनी विवाहित आयुष्य जगले नाहीत. त्यांनी ब्रम्हचर्याचे पालन केले. त्यांच्या पत्नी सुवर्चला या महान तपस्वी होत्या. त्यामुळे त्या विवाहानंतर त्या लगेच तपस्यासाठी निघून गेल्या.
वाचकहो, श्री हनुमान आणि सुवर्चला यांची मूर्ती असलेले मंदिर आंध्रप्रदेश मध्ये आहे.
हनुमान चा दूसरा आणि तिसरा विवाह कोणाशी?
श्री हनुमानांचा दूसरा विवाह हा रावणाची मुलगी अनंगकुसुमा हिच्याशी जल होता. जेव्हा वरूनदेव आणि रावण यांच्यात युद्ध झाले होते तेव्हा श्री हनुमान हे वरूनदेवातर्फे लढले होते. या युद्धात रावणाची हार झाली आणि रावणाने त्यांची कथा अनंगकुसुमा हीच विवाह हनुमानांशी केला. पण हनुमान वरूनदेवांच्या बाजूने लढल्यामुळे वरूनदेवांनी सुद्धा प्रसन्न होऊन त्यांची कन्या सत्यवती हीचा विवाह हनुमानांशी केला.
अशाप्रकारे श्री हनुमान यांचे 3 विवाह झाले असले. तरीही त्यांनी गृहस्थ आश्रमाचा स्वीकार केला नाही व ब्रम्हचार्याचे पालन केले. मित्रांनो ब्रम्हचारी हनुमानांना एक पुत्र सुद्धा होता. त्याचे नाव मकरध्वज होते. त्याच्या जन्मामागची कथा फार इंट्रेस्टिंग आहे. हनुमानांनी लंका जाळल्यानंतर त्यांच्या शरीराचे तापमान प्रचंड वाढले होते. त्यांच्या शेपटीची आगही विझलेली नव्हती तेव्हा त्यांच्या शरीराला थंड करण्यासाठी त्यांनी समुद्रात उडी घेतली त्यावेळी त्यांच्या घामाचा थेंब समुद्रातील एक मशाच्या मुखात पडला त्यातूनच मकरध्वजाचा जन्म झाला मकरध्वजाचे मुख वानरासारखे होते. व शरीराचा अर्ध भाग एका माशासारखा होता.
मकरध्वजाची आणि हनुमानांची भेट कशी झाली हे जाणून घ्यायचे असेल तर कमेन्ट करा .